पावसाळी अधिवेशनावर होणार्या महामोर्चास उपस्थित राहण्यासाठी धम्मपालसिंहराजे कांबळे यांचे आवाहन
बीड : वंचित मागासलेल्या बहुजन समाज जो भोगवट्याच्या जमीनीवर राहतो,जी सरकारी जमीन कसतो ती राहणार्या आणि कसणार्या व्यक्तीच्या नावे करण्यात यावी म्हणून वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय बहुजनहृदयसम्राट ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे पावसाळी अधिवेशनावर दि.२० जुलै रोजी सकाळी ११ वाजता महामोर्चा काढण्यात येणार आहे.तरी महाराष्ट्रातील तमाम भोगवटदार आणि गायरान धारकांनी महामोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन धम्मपालसिंहराजे कांबळे यांनी केले आहे. यासाठी सम्राट हिरवे,साहिल कांबळे, गौरव करपे,प्रविण शिर्के, गोविंद गरड,ओम साखरे,सागर गायकवाड, अभिजित गायकवाड, सोहेल शेख, ओमकार यादव,सुशील हिरवे, प्रथमेश कांबळे, संदिप कांबळे, दत्ता गायकवाड,अजय कांबळे, प्रविण सोनवणे, योगेश किर्दंत, धैर्यशील गोरे, निखिल वेडे, विशाल चौरे तसेच इतर असंख्य बहुजन सैनिक धम्मपालसिंहराजे कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चासाठी कष्ट घेत आहेत.