सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. परंतु या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात अकरा जणांचा मृत्यू झाला.
सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक श्री सदस्य गंभीर आहेत. हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.