बाबाने पायाने आशीर्वाद दिल्यास होतात इच्छा पर्ण
– खीरीने अनेक भक्तांचे आजार बरे झाल्याची अफवा
जबलपूर : बाबाच्या दर्शनाने दु:ख दूर होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला तर जीवन सफल होईल असे म्हणतात. असाच एका बाबा आपल्या भक्तांना लाथ मारून आशीर्वाद देत असून त्याचे भक्त म्हणतात की बाबांनी कोणत्याही भक्ताला पायी आशीर्वाद दिला तर त्याची इच्छा पूर्ण होते. या बाबाच्या हातच्या खीरीने अनेक भक्तांचे आजार बरे झाल्याची अफवा पसरल्याने मोठी गर्दी जमत आहे़ ् भक्तांना लाथाने आशीर्वाद देणारा हा भोले बाबा अपंग असल्याचे सांगितले जाते. तो हात वापरू शकत नशत नसून तो आणि बोलू शकत नाही़ त्यांचे दैनंदिन काम तो पायांनी करत असून त्याच्याकडे येणाºया भक्तांना त्याचे उपाय पायाने पाटीवर लिहून ठेवत असे.
मागील अनेक वर्षांपूर्वी जबलपूर संस्कारधनीच्या शक्तीनगरमध्ये हा भोले बाबा एका झाडाखाली बसायचा़ यानंतर जेव्हा तेथील लोकांनी पाहिले की हा बाबा बोलू शकत नाही आणि हात हलवू शकत नाही, तेव्हा लोक हळू हळू तिथे आले आणि त्यांना खायला, पेय आणि इतर गोष्टी देऊ लागले. त्यानंतर हळूहळू तेथे भोलेबाबांच्या भक्तांची गर्दी वाढू लागली. पायाने लिखाण करून लोकांचे प्रश्न सोडवायला सुरुवात केली. ज्या भक्ताच्या चरणी आशीर्वाद दिला त्याची इच्छा पूर्ण होते अशी अफवा पसरल्याने भक्तांची गर्दी जमू लागली़
या मंदिराची स्थापना झाल्यापासून येथे भोले बाबाची धुनी जाळली जात असून आजवर भोले बाबांच्या वयाचा अंदाज लावता येत नसल्याचे लोकांनी सांगितले. त्यांच्या वडिलांनी आणि त्यांच्या आधीच्या ज्येष्ठांनी भोले बाबांना त्याच रूपात पाहिले होते. या मंदिरात शरद पौर्णिमेच्या दिवशी वाटण्यात येणारी एक चमचा खीर घेण्यासाठी देशभरातून आणि राज्यातून भाविक येतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भक्तगण पुन्हा या मंदिरात येत आणि भंडारा इत्यादी कार्यक्रम आयोजित करत असत. हा बाबा कोणत्याही भक्ताकडून कोणताही पैसा किंवा सेवा घेतली नसल्याचे भक्त सांगतात़
भोले बाबा शिवाचे महान उपासक
या मंदिरात येणाºया लोकांचा असा विश्वास आहे की हा भोले बाबा शिवाचे महान उपासक आहे़ हा बाबा अतिशय पारंगत असून त्यांच्या चरणी आशीर्वाद घेऊन लोकांचे अनेक रोग बरे झाले असल्याने देशभरातून लोक त्यांच्या इच्छेने दर्शनासाठी येतात.
भोले बाबाची खीर रोग बरा करते
जबलपूर संस्कारधनीच्या शक्तीनगरमध्ये असलेल्या भोळे कुटी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी शरद पौर्णिमेच्या दिवशी वाटण्यात येणाºया खीरबद्दल अशी धारणा आहे की एक चमचा अनेक रोग बरे करते असे सांगितले जाते़