राजस्थानमध्ये जलजीवन मिशन घोटाळा
-अधिकाºयांची इडीमार्फत चौकशी
जयपूर : जल जीवन मिशन पेयजल योजनेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीचे पथक कारवाई करत आहे़ यामध्ये ईडीच्या पथकाने जयपूर आणि अलवरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले़ आता हे पथक राजस्थानचे वरिष्ठ आएएस अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुबोध अग्रवाल यांची चौकशी करण्याच्या तयारीत आहे़
जल जीवन योजनेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी इडीच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात अडीच कोटी रूपयांची रोकड जप्त केली आहे़ यासोबत या पथकाने सोन्याची वीट जप्त केली असून ही वीट जवळपास १ किलो वजनाची आहे़ इडीकडून होणाºया धाडसत्रामुळे राजस्थामध्ये अधिकारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे़