राजर्षी शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकांनी त्यांना ठार मारण्याचेही प्रयत्न केले होते. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करून महाराजांना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. तसेच शाहु महाराजांना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले होते. ज्यांच्या पुर्वजांनी राजर्षी शाहुंना महाराजांना त्रास दिला आज त्यांचेच वंशज इतिहासाचे विकृतीकरण करत आहेत.