महासम्राट बळीराजा
दरवर्षी आणि दरवेळी बहीण भावाला ओवाळताना बळीचे राज्य यावं म्हणून मागणी घातले परंतू आजचे भाऊ दरवर्षी आणि दरवेळी वामनांच्या वंशजांना मतदान करून बळीराज्याची अपेक्षा करणा-या बहीणीच्या स्वप्नाचं पाणी पाणी करतात तेव्हा त्या भावाच्या बुद्धीची कीव येते. म्हणून भावांनो तुम्ही खरच एकदा तरी महासम्राट बळीराजा, महात्मा फुलेंनी लिहलेला गुलामगिरी, शेतक-यांचा आसूड हे ग्रंथ वाचा आणि मग तुम्हीच या वामनी विचारांच्या वारसदारावर महात्मा फुलेंनी सांगितलेला शेतक-यांचा आसूड उगारून बुध्द शिव फुले शाहु आंबेडकर यांच्या रक्ताच्या वारसदारांना मतदान करण्याऐवजी विचारांच्या वासरदारांना मतदान करताल तेव्हा नक्कीच तुम्हाला तुमच्या बहिणीला बळीचं राज्य तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे 'याची देही याची डोळा' दिसल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित.
नवनाथ रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील
१. भट बोकड मोठा
२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
संपर्क : रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६४४०८७९४, ९७६२६३६६६२