देशातला एक नंबरचा एमडी डाॅक्टर म्हणजे नरेंद्र मोदी, ज्यांनी थाळ्या वाजून कोरोना पळवला श्रीकांत होवाळ

0 658

देशातला एक नंबरचा एमडी डाॅक्टर म्हणजे नरेंद्र मोदी, ज्यांनी थाळ्या वाजून कोरोना पळवला श्रीकांत होवाळ

 

लातूर : कोरोनाच्या नावाखाली आम्हाला भयभित करून सक्तीन लसीकरण केले. लसीमुळे लोकांना अनेक आजार होत आहेत, त्यात तरुण मुल ह्दयविकाराने मृत्यू पावले जात आहेत. याला हे सरकार जिम्मेदार आहे. परंतू देशातला एक नंबरचा एमडी डाॅक्टर म्हणजे नरेंद्र मोदी ज्यांनी थाळ्या वाजून कोरोना पळवला ते सर्वोच्च न्यायालयात म्हणतात आम्ही लस घेण्यासाठी लोकांना सक्ती केलीच नाही, लोकांनी गर्दी करून लस घेतली आहे. त्यामुळे लसीच्या दुष्परिणामांमुळे लोकांचा मृत्यू झाल्यास त्याची जिम्मेदारी सरकार घेणार नाही असं प्रतिज्ञापत्र याच एमडी डाॅ. नरेंद्र मोदींने न्यायालयात सादर केले असल्याची माहीती बीएमपीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी दि. २७ जून रोजी लातूर येथिल जनसंवाद दौ-यात दिली.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर येथून दि. ५ मे २०२३ रोजी सुरू झालेली महाराष्ट्र राज्यव्यापी जनसंवाद परिवर्तन यात्रा मिशन २०२४ ही मंगळवार दि. २७ मे २०२३ रोजी लातूर मधील संविधान चौकामध्ये आली होती. यावेळ प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढत राष्ट्रवादी काँग्रेसचे हेच सरकार होते, ज्यांनी कोरोना फक्त आठवड्यातून दोनच दिवस म्हणजे शनिवारी आणि रविवारी येतो यांचा शोध लावून बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आजपर्यंत सर्वसामान्य लोक पैसे घेऊन मत विकत होती आता स्वतःला विकणारे आमदार खासदार या महाराष्ट्रातील जनतेने पाहीले आहेत. अनेक लोक म्हणतात हे शिंदे सरकार आहे, पण माझा त्यावर विश्वास बसत नाही. कारण हे सरकार महाराष्ट्र ज्यांची लोकसंख्या केवळ दीडटक्के आहे ते देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत चालवत असल्याचे सांगितले. यावेळी विचारमंचावर उद्घाटक म्हणून महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अण्णाराव पाटील, अॅड. उदय गवारे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिपक इंगळे, अनुभव मंडप लातूरचे मनोज राघो व बहुजन मुक्ती पार्टी लातूर जिल्हाध्यक्ष . दत्ताभाऊ करंजीकर, जिल्हा उपाध्यक्ष जलील अत्तार, जिल्हा प्रचारक प्रेम शिंदे व जिल्हा सचिव बंडुसिंग भाट ठाकूर हे उपस्थित होते.

मराठा विरुद्ध दलित, मराठा विरूद्ध मुस्लिम वाद पेटविण्याचे काम फडणवीस करत आहेत, कारण त्यांना दुसरे कोणतेच काम नाही. परंतू मयताच्या टाळूवरचे लोणी खाणा-या फडणवीसांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. फडणवीसांच्या जातीची माणस विदेशी आहेत, जे देवेंद्र फडणवीस व मोहन भागवत हिंदू मुस्लिमांच्या दंगली पेटवण्याचे काम करतात त्यांच्या जातीच्या मुलीचे पती मुस्लिम आहेत. त्यामुळे या दोघांना विचारतो हा नेमका कोणता जिहाद म्हणायचे, हे एकदा फडणवीसांनी महाराष्ट्राला सांगावे. कारण गरीब हिंदुंना मुस्लिमांची काहीच अडचण नाही, मग तुम्हाला काय अडचण आहे रे राजकीय भडव्यांनो. हा देश मराठा आणि ओबीसींचा आहे असेही श्रीकांत होवाळ यांनी म्हटले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी दंगल घडवल्याचा इतिहास नाही, मग छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन फडणवीस तुम्ही दंगल का घडवत आहात ? कारण तुमच्या काॅग्रेस आणि भाजपचा इतिहास हा दंगली घडविल्याचा आहे. मुस्लिमांविषयी द्वेष पसरवणाऱ्या फडणवीसांना माझा सवाल आहे, त्यांनी शिवरायांसोबत गद्दारी केलेल्यात महाराष्ट्रातील एका तरी मुस्लिम व्यक्तीचे नाव सांगावे, तुमच्या जातीतील कितीतरी लोकांनी शिवाजी महाराजांसोबत गद्दारी केली त्या सर्वांची नावे जाहीर करा फडणवीस. तुमचे सरकार दंगली घडवत आहे, असं आमचं मत आहे. परंतू माणसाने माणसासारखे वागले पाहीजे. परंतू हे भाजप आणि संघाचे विचित्र वागताना दिसत आहेत. फडणवीस साहेब जनावरांसाठी माणसांना मारू नका. तुम्ही जो अन्याय आमच्यावर करताय तो तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे तुम्हाला जेवढा अन्याय सहन होईल तेवढाच अन्याय आमच्यावर करा. कारण आज सत्तेत तुम्ही आहात उद्या सत्ता आमची आल्यास व्याजासह हिशोब चुकता केला जाईल असा इशारा त्यांनी मोहन भागवत व देवेंद्र फडणवीस यांना दिला. त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.