जंगली रम्मीची जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश काय ? नांदेड मधील तरुणाचा अजय देवगण यांना पत्राद्वारे सवाल

0 211

जंगली रम्मीची जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश काय ? नांदेड मधील तरुणाचा अजय देवगण यांना पत्राद्वारे सवाल

 

नांदेड : फेसबुक, युट्यूबवर आणि टीव्हीवर सध्या जंगली रम्मी आणि ऑनलाईन गेमच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या जाहिरात अनेक सिने अभिनेते करताना दिसत आहेत, तर काही महिलाही भिंवडीला राहते म्हणून सांगत जाहीरात करण्यात अग्रेसर आहेत. या जाहिरातींच्या नादी लागलेल्या तरुणवर्ग देशोधडीला लागला आहे, कारण तो विमल पानमसालाची जाहीरात करून तरुणांना व्यसनी बनण्यास प्रवृत्त करणारा अभिनेता अजय देवगण हा जंगली रम्मीची जाहीरात करतो.जंगली रम्मीची जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश काय ? असा प्रश्न नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाने अजय देवगण यांना पाठवलेल्या पत्रात विचारला आहे.

सिनेअभिनेता अजय देवगण याला जंगली रम्मीची जाहिरात केले म्हणून नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात असणा-या वसुर येथील विलास शिंदे असं या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने दि. २० जून रोजी स्पीड पोस्टने अजय देवगण हे राहत असलेल्या त्यांना जुहू येथील पत्त्यावर पत्र पाठवले आहे. या पत्रात त्याने अजय देवगण यांनी आतापर्यंत जंगली रम्मी या गेममधून किती पैसे कमवले याबाबत एकदा फेसबुक लाईव्ह करुन महाराष्ट्राच्या तरुणांना सांगण्याची विनंती केली आहे.

विलास शिंदे तरुणाने अजय देवगणला यांना पाठवलेल पत्र सोशल मीडियावर व्हायरल ते जशाच तसे.

 

महोदय अभिनेता देवगन

सर नमस्कार आणि राम राम..

आपण एक अतिशय उत्तम अभिनेता आहात. आपले अनुकरण करणारे महाराष्ट्रात अनेक लाखो नवतरुण आहेत. हे तुमच्यासाठी अभिमानाची आणि तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे. आज काल सोशल मीडियाचा खुप सारे नवतरुण उपयोग करत आहेत. नवतरुणांना चांगली दिशा देण्याचे काम आपल्यासारख्या अभिनेत्याने सोशल मीडियावर केलं पाहिजे. पण सोशल मीडियावर आपली जंगली रम्मी या ऑनलाईन गेमची जाहिरात पाहून अनेक नवतरुणांना या गेम खेळण्याची जणू सवयच लागली.

याच सवयीमुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना प्रश्न पडला आहे की, आपण जंगली रम्मी हा ऑनलाईन गेम खेळून आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहे. जाहिरातीचा उद्देश काय आहे, हे महाराष्ट्रातील तरुणांना सांगितलं पाहिजं. नवतरुणांना जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे सर्व सांगितलं पाहिजे. ह्याच गेमला काही राज्यात बंदी आहे. आपण मात्र बिंदास्त जाहिरात करता. महाराष्ट्रातील तरुणांना हा जंगली रम्मी गेम किती फायद्याचा आहे. हे पण आपण सांगितले पाहिजे.

हाच गेम तुमच्या आजुबाचे किती मान्यवर खेळतात हे पण आपण पाहिले पाहिजे. कारण ग्रामीण भागातील नवतरुणांना चांगल्या गोष्टीचे मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहेत. त्यातच तुम्ही अशा जाहिराती करून नवतरुणांना काय संदेश देत आहोत हे पण सांगितलं पाहिजे. फक्त जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश असेल तर हाच उद्देश किती योग्य आहे. या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा आणि आपण ही जाहिरात बंद करावी. तसेच नवतरुणां चांगले विचार देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.

Leave A Reply

Your email address will not be published.