परळी बिहारमध्ये नाही तर महाराष्ट्रात येते
– बजरंग सोनवणे यांचा मुंडे बहीण भावाला टोला
बीड : परळी मतदार संघातील लोक दबवाखाली आहेत. परळी बिहारमधील नाही तर महाराष्ट्रात येते. त्यामुळे कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. आम्ही पाठीशी आहोत. यांची सत्ता आता राहणार नाही. शंभर दिवस राहिलेत, पुन्हा यांची सत्ता महाराष्ट्रातही येणार नाही, असे म्हणत बजरंग सोनवणे यांनी मुंडे बहीण भावाला टोला लगावला आहे. ते परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा गावात जाहीर सभेत ते बोलत होते.
पुन्हा महामारी येणार? – चीनकडून आयसीयू बेडची संख्या वाढवण्यावर भर
लस प्रमाणपत्रावरून मोदींची एक्झीट? – कोविशील्ड लसीबाबत वाद सुरू असताना मोदींच्या छायाचित्राबाबत चर्चा
यावेळी ते म्हणाले की, शेतकºयांच्या ऊसाचे पैसे बुडवले आणि कसल्या विकासाच्या गप्पा मारता? मी जिवंत असेपर्यंत तुमच्या ऊसाची चिंता करू नका. मी जर ऊस घेवून घेवून गेलो नाही तर या चौकामध्ये मला बुटाने मारा, असे आव्हानच बजरंग सोनवणे यांनी दिले.
कोरोना लसीमुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी घेण्यास केंद्र सरकारचा नकार – केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारने झटकले हात
पंकजा मुंडे यांना लोकसभेत पाठवा
पंकजा मुंडे यांना बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवा आणि देशाच्या विकासात आपले योगदान द्या, असे आवाहन आमदार नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाई शहरातील नागरिकांना केले.