वारकरी हे शिस्तबद्ध आहेत, प्रशासनाने आत्मचिंतन करावं देहू संस्थांचे विश्वस्त माणिक महाराज मोरे
देहू: आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याच्या वेळी मंदिराच्या दिशेने धावणाऱ्या तरुण वारकऱ्यांना पोलिसांनी वारकऱ्यांना संयमाने हाताळायला हवं होतं पण पोलिसांनी काठीने अडवलं प्रशासनाने आत्मचिंतन करावे. आळंदीत घडलेली ही घटना निषेधार्थ असून त्याचा मी निषेध करतो अस देहू संस्थांचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी म्हटलं आहे.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यात झटापट झाली, काहींना हाताने धरून बाजूला करण्यात आलं. घटनेचा देहू संस्थांचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी आळंदीत झालेला प्रकार हा निषेधार्थ आहे अस म्हटलं . पोलिसांनी वारकऱ्यांना हाताळताना संयम ठेवायला हवा होता. आपुलकीने, प्रेमाने सांगितल असतं तर असे मुद्दे उपस्थित झाले नसते. वारकरी हे शिस्तबद्ध आहेत ते कोणावरही आक्रमण करणार नाहीत. परंतु, अशा पद्धतीची वागणूक दिली तर त्यांना नक्कीच वाईट वाटेल. प्रशासनाने आत्मचिंतन करावं. अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. असेही माणिक महाराज मोरे यांनी म्हटलं आहे.