नेत्यांच्या कंबरेला मिठ्या मारणा-यांना हार्प काय घंटा समजणार?

0 804

नेत्यांच्या कंबरेला मिठ्या मारणा-यांना हार्प काय घंटा समजणार?

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
संत बन गये भोगी! या पुस्तकाचे लेखक

 

स्वतःच्या मेंदूची वाढ खुंटली की सगळ्या लोकांची मस्तक आणि बुध्दी लांडी दिसते अशी स्वतःला अतिहुशार समजणा-या काही मुर्खांची अवस्था झाली आहे. एखादा व्यक्ती जर का एखादा मुद्दा तर्क आणि पुराव्याच्या आधारे मांडून जनजागृती करीत असेल तर त्याने मांडलेले पुरावे खरे आहेत की खोटे हे शोधण्याची अक्कल नसते म्हणून तर हे भाडखाऊ भडवे ट्रोलिंगचे हत्यार उपसून इतरांवर वार करतात पण हा त्यांच्या बुध्दीचा मोठेपणा नसतो तर बुध्दीने केलेली टवाळखोेरी असते हे त्या मनोरुग्णांना सांगणार तरी कोण? सांगायचे यासाठीच की, जगभर काही मुठभर आणि झाटभर लोक वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून इथल्या मानव जातीला समुळ नष्ट करू पाहत आहेत. त्यात त्यांनी कोरोना सारखे षडयंत्र राबवून नरसंहार करीत असताना आमचे काही नालायक लोक तोंडाला मास्क घालून बसले होते. कोरोना काळात जे शांत होते त्यांच्या आत्माला शांती भेटावी यासाठी अनेक जण आज त्यांच्यासाठी फुले वाहताना दिसतात. जगभर अनेक षडयंत्र राबवली जात आहेत ते काहींना कळतात तर काहींना ते कळण्यापलीकडेच असतात हा ज्यांच्या त्यांच्या बुध्दीचा भाग आहे. त्याचे असे की, आज हार्प टेक्नोलॉजीच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडला जात आहे. हा पासून पाडण्याचे तंत्र जवळपास १९४६ पासून सुरू आहे. यामध्ये कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग १९४६ साली न्यूयार्कमध्ये झाला. क्लाउड सिडिंगमध्ये ४ हजार उंचीवर ढगांमध्ये एरोसोल आणि पावडरच्या सुक्ष्म कणांची फवारणी केली. याशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॉपिकल मेट्रोलॉजीच्या मते भारतात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयत्न टाटा फर्मने १९५१ मध्ये सिल्व्हर आयोडाईड जनरेटर वापरून केला. पण आमच्या येेड्यांना हे समजत नाही त्याला कोण काय करणार? आमचे काही मनोरूग्ण राजकीय नेते पाऊस पडावा यासाठी यज्ञ करताना दिसले अशा महामुर्खांना फाटक्या पायतानाचे दहा फटके दिल्यास एक म्हटले पाहिजे. कारण या राजकीय भडव्यांनी समाजाला नागविण्याचे आणि नासविण्याचे काम केले आहे. राजकीय नेत्यांची कंबर चाटणा-या समर्थकांना नेत्यांच्या कंबरेला मिठ्या मारण्याशिवाय दुसरे काही जमत नसल्याने त्यांना हार्प काय घंटा समजणार आहे?

किती सांगू तरी न ऐकती बटकीचे ! ✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
गेल्या ५०-६० वर्षांपासून कृत्रिम पावसाची ही प्रक्रिया वापरली जात आहे. याला क्लाउड सिडिंग म्हणतात. क्लाउड सिडिंगचे पहिले प्रात्यक्षिक फेब्रुवारी १९४७ मध्ये ऑस्ट्रेलियातील बाथर्स्ट येथे झाले. जनरल इलेक्ट्रिक लॅबने हे केले. ६० आणि ७० च्या दशकात अमेरिकेत अनेक वेळा कृत्रिम पाऊस पाडण्यात आला. यामध्ये वापरण्यात येणा-या सी डॉप्लर रडार यंत्रणेमुळे कृत्रिम पावसासाठी नगर जिल्ह्यातील राहुरी परिसर, उस्मानाबाद, लातूर व बीड परिसरात विमानाने पर्जन्यरोपण केले. यात उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत विमानातून ढगांमध्ये रसायनांची फवारणी करण्यात आली. उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यात ८ ठिकाणी रसायनांची फवाराणी करण्यात आली. यातील ३ ठिकाणी चांगला, तर ३ ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. (लोकसत्ता ८ ऑगस्ट २०१५) यापूर्वी औरंगाबादपासून २५० किलोमीटर परिघात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आवश्यक यंत्रणा बसवण्याचे काम वेदर मॉडिफिकेशन लिमिटेड या कंपनीस देण्यात आले. या सर्व प्रयोगासाठी २७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. विमानाच्या साहाय्याने सिल्व्हर आयोडाइड व सोडियम क्लोराडाइडसारखी रसायने हवेत फवारली जातील. ज्यामुळे २५ ते ३० मिनिटांत पाऊस पडू शकेल. अमेरिकेतून यासाठीची यंत्रसामग्री पाठवली असून, रसायन फवारणीचे विमान कोल्हापूरला आले असल्याचे शर्मा यांनी सांगितले. (लोकसत्ता २३ जुलै २०१५) याषिवाय कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद येथील विमातळावरून प्रथमच दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरावरील जमा झालेल्या ढगांवर सुमारे एक तास रासायनिक फवारणी करण्यात आली. त्यानंतर दीड तास झालेल्या पावसाने तालुक्यातील बंधारे ओसंडून वाहू लागली. याव्यतिरीक्त बाकी ठिकाणी तेरा दिवस प्रयोग सुरू होता त्यात रासायन सोडणारे विमान चार दिवस हवेत होते. त्यामुळे शेवगाव तालुक्यात पाऊस पडला. (लोकमत २३ ऑगस्ट २०१९) सिल्व्हर आयोडाइड व सोडियम क्लोराडाइडसारखी रसायने हवेत फवारून या षडयंत्रकारी लोकांनी पावसाचे प्रयोग करून राज्यातील राहुरी, उस्मानाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद, तुळजापूर, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात पाऊस पाडला हे आमच्या लोकांना का माहित नसावे? आपल्या पुरता मर्यादित विचार करणारे लोक जन्माला आल्याने त्यांना रसायनच नव्हे तर जनावरांच्या मुताचा जरी पाऊस पाडला तरी काही देणेघेणे नाही अशी लोकांची मानसिकता झाली आहे. पण रसायनयुक्त पावसाचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील हे मनोरूग्न लोक का विसरत असतील? षडयंत्र राबवून पाडला जाणारा पाऊस हा आमच्या उपयोगाचा असू शकतो का? ज्या लोकांना नवे तंत्रज्ञान आणि त्याचे दुष्परिणाम सहज लक्षात येतात ते लोक इतरांना जागरूक करण्याचे काम करतात पण आमची येडी लोक बेंडकांची लग्ने लावण्यात धन्यात मानतात. या मुर्खांनी स्वतःचा जीव दिला तर कमीत कमी बेंडकतरी योगी मोदी या सांडासारखे (रावसाहेब दानवे यांचा काम करणारा बैल कोण?) सुखाने जिवन जगतील.

कोरोना खोटा की कॅप्सूल खोटी ? नवनाथ दत्तात्रय रेपे
क्लाउड सिडिंगच्या माध्यमातून पाऊस पाडता आणि पडणारा पाऊस थांबवता येतो. यासाठी अनेक रसायनांचा वापर केला जातो. हे तंत्र यापूर्वी अनेक देशांनी वापरले आहे. या तंत्राचा वापर करून चीनने पडणारा पाऊस रोखला होता. यासंदर्भात (बिजनेस टुडे १७ नोव्हेंबर २०२३) ने एक वृत्त प्रसारित केले असून त्यात म्हटले की, “क्लाउड सीडिंग या तंत्रामध्ये सिल्व्हर आयोडाइड, पोटॅशियम आयोडाइड किंवा कोरड्याा बर्फासारख्या पदार्थांसह ढगांची बीजन करणे समाविष्ट आहे. हे धोरण संयुक्त अरब अमिराती सरकारने देशातील पाणी टंचाईच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी काही वेळा वापरला आहे. मानवनिर्मित पर्जन्य किंवा कृत्रिम पाऊस निर्माण म्हणूनही ओळखले जाणारे, हे तंत्र यूएई पर्शियन गल्फ प्रदेशात वापरले होते. कृत्रिम पावसाचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे २००८ च्या ऑलिम्पिक दरम्यान जेव्हा चीनने बिजिंगच्या ओपन-एअर ९१,००० आसनांच्या ऑलिम्पिक स्टेडियमवर पाऊस रोखण्यासाठी २१ क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. पीपल्स रिपब्लिक आपल्या राष्ट्रीय हवामान बदल कार्यालयाला दरवर्षी लाखो डॉलर्सचे वाटप करते. १९९९ ते २००७ दरम्यान सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या म्हणण्यानुसार, या कार्यालयाने ४७०,००० चौरस किलोमीटरचे गारपिटीपासून संरक्षण केल्याचा दावा केला आणि २५० अब्ज टनांपेक्षा जास्त पाऊस निर्माण केला. याशिवाय रशियन सरकारने सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पाऊस रोखण्यासाठी दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली.“ मग बघा ज्यावेळी शेतक-याच्या पिकाला पावसाच्या पाण्याची गरज असते त्यावेळी पाऊस रोखला जात नसेल का? ज्यावेळी फळबागायतदार शेतक-यांना पावसाची गरज नसते त्यावेळी मात्र वादळी वा-यासह जोरदार गारपीठ होताना अनेकांनी पाहिले आहे. माझ्या गावच्या १०० वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एप्रिल महिन्यात पूराच्या पाण्याने नदी कधीच वाहीली नाही. मात्र २०२१-२२ च्या एप्रिल महिन्यात झालेल्या पावसाने नदीला पूर आल्याने दोन गावचा संपर्क तुटला हे कसे? बीडमधील बिंदुसरा ही हंगामी नदी २०२३ च्या मार्च आणि एप्रिल महिन्यात कडक उन्हाळ्यात वाहत असताना दिसली तरी कशामुळे? वृक्षतोडीने पावसाचे प्रमाण घटले असेल तर मग अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले कसे? ज्या वेळी शेतीसाठी पावसाची आवश्यकता असते त्या वेळी जाणीवपूर्वक पाऊस थांबवला तर जात नसेल याचाही आम्हाला विचार करावा लागेल. ज्या वेळी पावसाची आवश्यकता नसते त्या वेळी तो धो धो पाडला तर जात नसेल? कारण हार्प तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाऊस जसा पाडता येतो तसाच तो थांबवता पण येतो हे बिजिंग प्रकरणावरून सहज लक्षात येते. अवेळी पाऊस पाडून शेतकरी संपवण्याचे काम तंत्राच्या सहाय्याने केले जात आहे. याकडे आमच्या तरूणांनी लक्ष दिले पाहिजे. यापूर्वी मध्यप्रदेशमध्ये हार्प तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाडल्या जाणा-या पावसावर नियंत्रण घालावे यासाठी शेतक-यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्याची बातमी वाचणात आली होती.

जहाँ डर हैं, वही कोरोना क्यो हैं ? नवनाथ दत्तात्रय रेपे
शेतक-यांच्या शेतीवर काही राजकीय आणि उद्योगपती गिधाडे लक्ष ठेऊन आहेत. या गिधाडांना शेतकरी संपवून त्याच्या शेतीचे लचके तोडायचे आहेत. यासाठी ते हार्प तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कोट्याावधी रूपयांची फंडींग करून शेतीचे नुकसान करू पाहत आहेत. शेतकरी आपल्या शेती आणि शेतातील पीकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. एकवेळ तो पोटाला वेळेवर अन्न खात नाही पण शेतीला खतपाणी वेळेवर देतो. मग शेवटी तो या षडयंत्रकारी लोकांच्या सापळ्यात आडकून पोटच्या लेकरागत सांभाळलेल्या पिकाचा सत्यानाश झालेला बघतो. शेतीचे नुकसान झाले म्हणून तो जेव्हा सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करतो तेव्हा दुस-यांच्या घाण्याला जुंपलेले सुशिक्षित नोकरादार रेडे शेतकरी सारख पैसे मागतो म्हणत त्याच्या मागणीची टिंगल टवाळी करतात. यापूर्वी ‘रविना टंडन नावाची पाचंट अभिनेत्री शेतक-यांना चपलेने मारले पाहिजे अशी म्हणाली होती.’ अशा शेतकरी विरोधी नालायक लोकांना आमच्या घरातील महिलांनी रस्त्यावर ओढून पायतानाचे फटके दिले पाहिजेत. काल परवा गायीचा पृष्टभाग तळून खाणा-या शेतकरी विरोधी कंगणा रणावतचे एका शेतकरी कुटुंबातील शेरणीने थोबाड रंगविले. अशा मेंदू नसलेल्या राजकीय भडव्यांना जर शेतकऱ्यांनी फटके देण्याचे ठरविले तर शेतकरी विरोधी वक्तव्य करणारे भाजपचे दानवे, खडसे, गडकरी, भंडारी आणि शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणून हिणवणारे खाजपाई कुत्रे? हिमालयात जाऊन बसण्यास वेळ लागणार नाही. सत्तेत असणारे राजकीय भडवे हे भांडवलदारांच्या हातातील चमचे आहेत. जे हार्पच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देशोधडीला लावून त्यांच्याकडे असणारी शेती लुटण्यासाठी जाणिवपूर्वक शेतीचे नुकसान करण्यासाठी भांडवलदारांच्या घरात पाणी भरत नसतील का? कारण दुबईमध्ये जो पाऊस झाला तो नैसर्गिक नसून तो कृत्रिम होता. याविषयी हवामानशास्त्रज्ञ कॉलिन मॅककार्थी यांनी ‘इकॉनॉमिक टाईम्स’ला सांगितले की, ‘दुबईत एका दिवसात पडलेल्या पावसाचे प्रमाण साधारणपणे दीड वर्षाच्या कालावधीत पडणा-या पावसाच्या बरोबरीचे आहे.’ याशिवाय हवामानशास्त्रज्ञ फ्रेडरिक ओट्टो म्हणाले की, ‘यूएई आणि इतर प्रदेशांमध्ये होणा-या अतिवृष्टीला ग्लोबल वॉर्मिंगदेखील कारणीभूत आहे. ओमान आणि दुबईतील विध्वंसक पाऊस बदलत्या वातावरणामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे.’ दुबईसह यूएईच्या इतर भागांमध्ये क्लाउड सीडिंगमुळे पाऊस झाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ओमानमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला, ज्यात राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीनुसार यात १८ लोकांनी आपला जीव गमावला. विशेष म्हणजे ओमाननेदेखील पर्जन्यवृष्टी वाढविण्यासाठी क्लाउड सीडिंग तंत्राचा वापर केला आहे. हा पाऊस बहारीन, कतार आणि सौदी अरेबियातही पडला. क्लाउड सीडिंगमध्ये सिल्व्हर आयोडाइडसारख्या पदार्थांचा वापर होत आहे. सिल्व्हर आयोडाइड हे रसायन महासागरातील परिसंस्थेवर, ओझोन थरावर आणि वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडच्या पातळीवर परिणाम करू शकतात. सिल्व्हर आयोडाइडमुळे वनस्पती, प्राणी आणि माणसांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याने शास्त्रज्ञ क्लाउड सीडिंगशी संबंधित दीर्घकालीन परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.’ (लोकसत्ता १८ एप्रिल २०२४) पाऊस पाडला जात नाही म्हणणा-या मुर्खांना या गोष्टी कळतील की नाही दे तर त्यांचा मेंदूच जाणो. जिथे गुडघे न फोडता लेकरं मिळू लागली तिथे कृत्रिम पावसाचे काय घेऊन बसलात. अवेळी कृत्रिम पाऊस पाडून शेतक-यांना नष्ट करून त्यांची साधन संपत्ती लुटण्याचा काही उद्योगपतींनी चंग बांधला आहे. याला सर्वात जास्त बळी तर आमच्यातील शिकलेले लोकच जास्त बळी पडून त्यांच्या पालखीचे भोई बनून दलाली करीत कृत्रिम पाऊस, कृत्रिम बुध्दिमत्ता आणि न्यू वर्ल्ड ऑर्डर संदर्भात जागृती करणारांची तोंड दाबण्याचा प्रयत्न करतात. पण तामिळनाडू सरकारने १९८३, १९८४-८७ आणि १९९३-९४ व कर्नाटक सरकारने २००३ आणि २००४ मध्ये क्लाउड सिडिंगचा प्रयोग करून कृत्रिम पाऊस पाडला होता. हा कृत्रिम पाऊस पाडण्याचा इतिहास तोंड दाबल्याने झाकता येणार आहे का?
कृत्रिम पाऊस पाडता येतो असे म्हटले तर आमचे काही येडपट लगेच म्हणतात की, दुष्काळ आहे, धरणे कोरडी पडलीत मग पाडा की पाऊस. त्या मनोरुग्णांना सांगावेसे वाटते की, पाऊस पाडा म्हटले की षडयंत्रकारी लोक लगेच पाडणार आहेत का? तुम्हाला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तसा पाऊस पाडायला ते काय तुमच्या बापाचे नोकर आहेत का? षडयंत्रकारी लोक त्यांच्या नियोजित षडयंत्राप्रमाणे पाऊस पाडून तुम्हाला देशोधडीला लावत आहेत. जे येडपट कृत्रिम पावसाचा खेळ समजून घेत नाहीत ज्यांच्या मेंदूची विचार करण्याची क्षमता खुंटली आहे, असे म्हटले तरी काही हारकत नाही. कारण अमेरिकेतील न्यायालयसाने एका याचिकेवर मत व्यक्त करताना कोरोना लसीने लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट झाल्याचे सांगितले आहे. वाचकाहो तुमच्या जन्मापूर्वी बारामतीत कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले आहेत. ‘आयआयटीएमने १९७३-७४, १९७६ आणि १९७९-८६ या कालावधीत बारामतीमध्ये क्लाउड सीडिंग प्रयोग केले. या परिणामांनी पावसात २४ टक्के वाढ झाली. या क्लाउड सिंडिंगला वर्षा प्रकल्प हे नाव दिले होते.’ (टाईम्स ऑफ इंडिया ४ जून २००४ ) याशिवाय अमेरिकन मेटेरॉलॉजिकल सोसायटीच्या बुलेटीनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे सांगितले आहे की, ‘महाराष्ट्रातील सोलापूर भागात केलेल्या क्लाउड सीडींग प्रयोगामुळे सामान्य परिस्थितीपेक्षा १८ टक्के जास्त पाऊस झाला.’ (टाईम्स ऑफ इंडिया २६ आक्टोबर २०२३) क्लाउड सीडींगचा प्रयोग करून पावसाच्या प्रमाणात वाढ केली जात असेल तर सध्या होणारा अवकाळी पाऊस हे शड्यंत्राचा नाही हे कोण सांगेल का? स्वतःच्या प्रियशीच्या चेह-याकडे बघुन तिच्या मनातील भाव ओळखणारे आमचे लोक १९७३-७४ ला सुरू झालेल्या कृत्रिम पावसाचा खेळ अजूनही समजू शकले नाहीत हा त्यांच्या मुर्खपणा म्हणावा लागेल. आमच्या लोकांचे लक्ष कृत्रिम पावसाकडे जाऊ नये यासाठी हार्प तंत्रज्ञान राबविणा-या चोट्यांनी आमच्या समाजात काही दलाल निर्माण केले असावेत हा माझा संशय आहे. मी यापूर्वी दि.२५ ऑगस्ट २०२३ रोजी लिहिलेल्या ‘गुगळीचे चक्रपाणी बाबा: अंदाज देतात येड्यावाणी’ या लेखात दलालांकडून केल्या जाणा-या हुजरेगीरीचा समाचार घेऊन हे भडवे आमच्या सामान्य शेतकऱ्यांना कसे मुर्खात काढतात हे पुराव्यानिशी मांडले आहे.

गुगळीचे चक्रपाणी बाबा : अंदाज देतात येड्यावाणी
कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी आयआयटी कानपूरला सुमारे सहा वर्षे लागले. या प्रोजेक्टवर मणींद्र अग्रवाल यांनी सांगितले की, या प्रोजेक्टची सुरुवात २०१७ मध्ये झाली. एअरक्राफ्टसाठी एक उपकरण हवं होतं त्यासाठी अमेरिकेला २०१९ मध्ये आर्डर देण्यात आली. पण, काही दिवसांनी कोविड आले आणि सर्व काही ठप्प झालं. मग हे उपकरण गेल्या वर्षी आले तेव्हा एअरक्रॉफ्टच्या बदलासाठी परवानगी घ्यावी लागली. ही चाचणी यशस्वी झाल्याने यामध्ये एअरक्रॉफ्ट आकाशात जाऊन कृत्रीम पावसाचे बीज पेरणी करतो. यात बर्फ, सिल्व्हर आयोडीनसह रासायनिक तत्व मिळून एअरक्रॉफ्टमध्ये खास टूल लावले जाते. एअरक्रॉफ्ट विशिष्ट उंचीवर गेल्यावर केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थोड्याा वेळाने पाऊस पडतो. या पावसाचे थेंब थोडे मोठे असतात. (टीव्ही ९ मराठी २३ जून २०२३) प्रोजेक्टवर मणींद्र अग्रवाल यांचे मत आमच्या लोकांना कधी समजेल? एअरक्रॉफ्टच्या माध्यमातून बर्फ, सिल्व्हर आयोडीनसह रासायनिक तत्वाची फवारणी करून पाडलेला गेलेला रासायनयुक्त पाऊस आमच्या उपयोगाचा असेल का? मागे काही दिवसांपूर्वी विदर्भात एके ठिकाणी पावसाच्या केसासारख्या सरी आल्यानंतर रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांवर लाल रंगाचे डाग पडल्याचे बातमी आली होती. ‘मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी २ विदेशी आणि ४ भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला. कृत्रीम पावसाठी दुबईस्थित कंपनीशी चर्चा करा, असे निर्देष मु़ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या चाचणीसाठी एकावेळी ४० ते ५० लाख रुपये अंदाजित खर्च येणार असून या कंपन्यासोबत तीन वर्षांसाठी करार केला जाणार आहे.’ (लोकमत २३ डिसेंबर २०२३) ‘यासाठी २००९ मध्ये मुंबईत कृत्रिम पाऊस पाडणा-या इस्रायलमधील मॅक्रॉट कंपनीला पालिकेने आमंत्रित केले होते. या कंपनीच्या प्रतिनिधींनी पालिका अधिका-यांसमोर कृत्रिम पावसाचे सादरिकरणही केले.’ (लोकमत २९ जुन २०१४) मग बघा इस्रायलमधील मॅक्रॉट कंपनीने जर २००९ मध्ये मुंबईत पालिका अधिका-यांसमोर कृत्रिम पावसाचे सादरिकरण केले असेल तरीही आम्ही कृत्रिम पाऊस पडता येत नाही म्हणत असू तर मग आपली स्वतःची बौध्दिक वेश्यागिरी होत असल्याचे कबूल करायला काय आडचण आहे?
संयुक्त अरब अमिराती पंजाबच्या मदतीने पाकिस्तानने क्लाउड सिडिंगचा वापर करून पहिला कृत्रिम पावसाचा प्रयोग केला. याषिवाय ‘अमेरिकन मेटिओरोलॉजिकल सोसायटी (बीएएमएस)च्या बुलेटिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, महाराष्ट्रातील सोलापूर विभागातील क्लाउड सीडिंग चाचणीमुळे नेहमीच्या नमुन्याच्या तुलनेत पावसात १८ टक्के वाढ झाली. टीओआयमधील एका अहवालानुसार, पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि इतर संस्थांच्या शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला.’ (बिजनेस टुडे १७ नोव्हेंबर २०२३) यापूर्वी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे म्हणाले होते की, ‘बीड व नगर जिल्हयांच्या सीमावर्ती भागात २० रासायनिक फ्लेअर्सचा मारा करीत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग शेवगाव (नगर), तसेच सिल्व्हर आयोडाईड आणि सोडियम क्लोराईड या रसायनांचा मारा ढगांवर करण्यात आला. बीडच्या शिरूर व माजलगाव तालुक्यांतील पाडळी, राजुरीतांबा व लिंबागणेश या तीन गावांवर या पर्जन्यरोपणाचा परिणाम काही अंशाने दिसून आल्याचा दावा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला. कृत्रिम पावसासाठीची आपत्ती व्यवस्थापन केंद्रे सुरू ठेवून औरंगाबादचे केंद्र कायमस्वरूपी असेल.’ (लोकसत्ता ५ ऑगस्ट २०१५)

कोरोना लस नव्हे तर विष आहे ! ✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
त्यामुळे आमच्या बहुजन समाजाला सांगावे वाटते की, कोरोना जसे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे तसे हार्प टेक्नॉलॉजी व कृत्रिम बुध्दीमत्ता हे पण एका षडयंत्राचा भाग आहे. तुम्हाला कोणत्या कोणत्या षडयंत्रात कसे गुंतवून नेस्तनाबुत करायचे यांचे काम त्या त्या देशातील सत्ताधारी आणि विरोधकांकडे जागतिक भांडवलशाहीने दिले आहे. आमच्या लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट झाल्याने ते आपल्यासाठी महत्वाचे काय आणि दुष्परिणामकारक काय याचे जाण आणि भान न राहिल्याने भांडवलदार दिवसेंदिवस नवनवे फंडे वापरून आमच्या गळ्याला फास आवळत आहेत. हा फास ज्यांच्या हाताने आवळला जात आहे ते सत्तेतील आणि विरोधातील राजकीय वळू असून त्यांचे आंड ठेचल्याशिवाय यांचा कंड शमणार नाही त्यामुळे शेतकरी कुटुंबातील तरूणांनी जग आणि देशात जे नवे नवे षडयंत्र राबवली जात आहेत त्याची माहिती घेऊन त्यांचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो यांचा विचार करून जनजागृती केली पाहिजे. ‘सोशल हेल्थ मुव्हमेंट’च्या माध्यमातून महाराष्ट्रात कोरोना षडयंत्राचा बुरखा टराटरा फाडल्याने राज्यातील अनेक कुटुंब लस न घेता आजही सुखा समाधानाचे जीवन जगत आहेत आणि ज्यांना कोरोना हे षडयंत्र नसून तो एक रोग आहे असे वाटले त्यांनी लसीचे विष आपल्या शरिरात घेतले ते आज कोणत्या प्रकारचे जीवन जगत आहेत हे एकदा लस घेतलेल्या माणसाला विचारून बघा. कारण या षडयंत्राच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या लसीने अनेकांचा कंदील विझला तर अनेकांचा पोपट मेला आहे. त्यामुळे षडयंत्र समजून घ्या. षडयंत्र राबविणारे लोक तुमच्या हिताचा विचार करीत नसल्याने ते त्यांचे ध्येय पुर्ण करण्यासाठी वाटेल त्या पद्धतीने वाटेल तसे प्रयत्न करून त्यांची ध्येयपुर्ती करतात पण त्यात वाट लागते ती सामान्य लोकांची. त्यामुळे सामान्य माणसाने आपला पोपट मरण्यापूर्वी नेत्यांच्या कंबरेला मारलेली मिठी सोडावी आणि ‘न्यू वर्ल्ड ऑर्डर’च्या अजेंड्यातील हार्प, कोरोना, लसीकरण, एआय, नवीन शैक्षणिक धोरण त्याचे फायदे आणि तोटे समजून घ्यावेत अन्यथा सत्यानाश अटळ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.